Monday, January 3, 2011

मी गर्दीत वाट हुडकतोय .................

रोज सकाळ होते , मी जागा होतो , पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो . उठून शाळेत जायचो , गर्दीत सामील व्हायचो , बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो , लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो , आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो . शाळा झाली , सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली , सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो .




शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो . ........................



१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो . अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो , मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो . अरे तो यूएस ला गेला , हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो . सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो .



शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो ............................



लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो . माझेही इंडक्षन झाले , काम झाले , कष्ट झाले , अप्रेज़ल झाले , मॅनेजर ला शिव्या देणे झाले , ३ / ४ स्विच झले , पॅकेज वाढले . मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो . मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला " पन्या / पंक्या " होतो आता " पी . एम ." झालो आहे . आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे . एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा , पण मला कोणी जवळचा नाही , वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३ / ४ तास गप्पा मारणारा मित्र नाही . मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो , वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच / डिनरसाठी तडफडतो .

घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो , २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “ जाउ दे त्याला निवांत ” महणून सोडून देतात . असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो . आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे , माझी कंपनी , माझे पॅकेज , माझे डेसिग्नेशन , माझा वेरियबल , माझा बुक केलेला फ्लॅट , त्याचे प्रोग्रेस मधील फोटो , माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम , माझी कार ……….. सगळ्याना दाखवत बसतो …. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो , …....



मला ढीग भरून स्क्रॅप येतात , ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात , सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात . त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही , आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही . कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा , किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही , मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही , आम्ही ढीग आउटिंग / पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही . गावाकडे आहेत काही मित्र , पण मी तिकडे जात नाही , आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे , ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही . लोकही माझे मेल / स्क्रॅप / पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण ; “ च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते ” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची , एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात .



गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे ……… नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत , आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही , कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील , पण दुखा : च्या वेळची ग्यारेंटी नाही . पण तुम्ही सुधा दु : खी व्हाल , त्या वेळेला कलीग , डिलीवरेबल्स , मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे .... सॉरी ... असे म्हणत कलटी टाकतील . सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय ? दु : ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही . प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं . अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच , जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात .



मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो ? सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल , या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो . काय असते ही गर्दी ? इयत्ता १ ली ते ….. इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी ? कोण ठरवतो यांची दिशा ? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही ...... पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात . .. आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो . आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत , कशासाठी ते कुणालाच माहीत नाही , मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का ? मला पक्के मित्र मिळत नाहीत का ? का मीच त्या वाटेला जात नाही . विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन पार्किंग मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो . पण आता ठरवले आहे …… काही तरी केले पाहिजे , जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे , का मी जाउ शकत नाही ? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का ? कोण मला अडवणार ? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून , का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून ? बरेच काही हरवलय ........ बरेच काही गमावलय ............. नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए ........ गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत : चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो .......... गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय .



कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे . बसस्स ....... आता ... ठरवले आहे … आणि सुरुवातही केलेली आहे , कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर , हा थोडा वेगळाच वाटतो आहे , लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला . आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो , ए हा असा का करतो ? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे , अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा " घुमाई देवी " च्या यात्रेला गावी जाणार आहे , हे हा खरेच असे करणार आहे ? मी थोडा वेगळा झालो आहे , गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे .......... लोक वाट चुकलेला का म्हणेना मला …… पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे . एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय ?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही “ स्क्वेरफूट ” घेण्यासाठी धडपडत आहोत काय ?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत : चे समाधान करत आहोत काय ?



आपलाच ... गर्दीत हरवलेला एक मित्र ,